मुंबई :- विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर ठरावाविरोधात 99 मतं पडली.विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी तीन महत्वाच्या घोषणा सभागृहात केल्या.
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2022
पहिली घोषणा म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा त्यांनी केली. हिरकणीचा इतिहास लोकांच्या स्मरणात रहावा आणि मातृत्वाचा हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचावा यासाठी हिरकणी गावाचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2022
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2022