मुंबई – बाळासाहेब प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांच्यात ओतप्रेत राष्ट्रभक्ती भरली होती. त्यांनी कधीही मतांवर डोळा ठेवून राजकारण केले नाही. सत्ता स्थापन झाली असती पण त्यांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी तडजोड केली नाही, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
वाघोली : राष्ट्रवादीच्या युवा संघटनेला धक्का; ‘गणेश सातव पाटील’ यांचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात झाले. या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षिय नेते उपस्थित होते.
“पेट्रोलचे दर कमी होतील…” पेट्रोलियम मंत्री हरजीत सिंग पुरी यांचा आशावाद
एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार ऐकताना आजही उर्जा मिळते, प्रेरणा मिळते. एकदा शब्द दिला की तो फिरवायचा नाही ही बाळासाहेबांची शिकवण, आम्ही ती पाळली. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आणि गुरुही होते. आज आनंद दिघे असते तर त्यांना अभिमान वाटला असता. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि ठाण्यात त्याचे पालन व्हायचे. ठाणे आणि शिवसेना हे नातंच वेगळे होते.
वयाच्या 16व्या वर्षापासून मी बाळासाहेबांसोबत काम केले, त्यांची भाषणे ऐकली. आज त्यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले. आज मी मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्यात येते हा दुर्मिळ क्षण आहे. एकेकाळी महाराष्ट्रात प्रस्थापितांची सत्ता होती, बाळासाहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत ही सत्ता पोहोचवण्याचे काम केले.
कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नसताना, बाळासाहेबांनी त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री केले. एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री आहे, ही जादू फक्त बाळासाहेबांचीच आहे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, आता त्याचा अनुभव आम्ही घेत असल्याचे त्यांनी सांगितले.