मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १७० आमदार आमच्यासोबत आहेत. तसेच बहुमत चाचणीमध्ये आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. याशिवाय त्यांनी एक बैठक झाल्याचे संगितले. या बैठकीत काही निर्णय झाले आहेत. मुंबईतील पावसाच्या बाबतीत खबरदारीच्या उपाययोजना सरकारतर्फे करण्यात येतील असे ते म्हणाले.
The rest of the MLAs will come to Mumbai tomorrow. Governor has called a session on July 3-4. We've 170 MLAs and are increasing. We have a comfortable majority in the Assembly: Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/BYJBI33Jq3
— ANI (@ANI) July 1, 2022
आरे कारशेडबाबत जनतेचं हित पाहणार
उद्धव ठाकरे यांनीआरे मेट्रो शेड संदर्भांत ‘आरे चा निर्णय बदलल्याचं वाईट वाटलं. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मी पर्यावरणासोबत आहे. आरे चा निर्णय कृपा करून रेटून नेऊ नका असं पत्रकार परिषदेत संगितलं’ त्याबाबत माध्यमांशी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले , ‘आरे कारशेडबाबत जनतेचं हित पाहणार ‘ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अनेक प्रकल्पाना गती देणार
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आमच्या सरकारने अनेक प्रकल्पांना गती देण्याचे ठरवले आहे. मग ते जलयुक्त शिवार असेल ,मेट्रो आणि जलसंपदा विभागाच्या कामांना देखील गती देण्यात येईल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष
यावेळी पुढे बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल ? शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान कसे अंमलात आणता येतील ? याकडे लक्ष देणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत यासाठी देखील नवे सरकार विशेष प्रयत्न केले जातील.