मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि ११ मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट शिष्टमंडळासह भेट घेतली व मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपतींना विनंती करणारे एक निवेदन सादर केले.
यावेळी जेष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, दिलिप वळसे पाटील, जयंत पाटील, एकनाथ शिंदे तसेच माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
“मराठा आरक्षण देणे हे राज्य सरकारचा नव्हे तर केंद्र सरकारचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने केंद्र सरकारने हे आरक्षण द्यावं या मागणीसाठी माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी हे आरक्षण केंद्र सरकारने द्यावे अशी विनंती करणारे पत्र राज्यपालांना सुपूर्त करण्यात आले. – एकनाथ शिंदे (नगरविकासमंत्री)
मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळायला हवा. राज्यांचे अधिकार राज्याकडे असावेत. हा मुद्दा आहे. मराठा समाजाने समजूतदारपणा दाखवला आहे. राज्यपालांना याबाबत पत्र दिलेले आहे, त्याचे उत्तर लवकर मिळावे. राज्यपालही सहमत आहेत. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे, निवेदन सादर केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.