नवी दिल्ली – मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांवर मोठा निर्णय घेतला आणि त्या चलनातून बाद करण्याची घोषणा केली. RBI ने 2000 रुपयांची नोट मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या नोटा छापल्या गेल्या आहेत त्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बदलता येतील. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘म्हणूनच आम्ही म्हणतो की पंतप्रधानांनी शिक्षित असावे. निरक्षर पंतप्रधानांना कोणीही काहीही म्हणू शकतो.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, “आधी म्हणत होते की 2000 ची नोट आणल्याने भ्रष्टाचार थांबेल. आता ते म्हणत आहेत की 2000 ची नोट रद्द केल्याने भ्रष्टाचार संपेल. म्हणूनच आम्ही म्हणतो, पंतप्रधानांनी शिक्षित असले पाहिजे. अशिक्षित पंतप्रधान कोणीही काहीही बोलले तरी त्याला समजत नाही. याचा त्रास जनतेला सहन करावा लागतो.’ असं म्हणत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे .
अरविंद केजरीवाल ट्विट
पहले बोले 2000 का नोट लाने से भ्रष्टाचार बंद होगा। अब बोल रहे हैं 2000 का नोट बंद करने से भ्रष्टाचार ख़त्म होगा
इसीलिए हम कहते हैं, PM पढ़ा लिखा होना चाहिए। एक अनपढ़ पीएम को कोई कुछ भी बोल जाता है। उसे समझ आता नहीं है। भुगतना जनता को पड़ता है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 19, 2023