रेल्वेतून प्रेमसाईसिंग टेकम यांची बॅग चोरीला
नवी दिल्ली : छत्तीसगडचे शालेय शिक्षणमंत्री प्रेमसाईसिंग टेकम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक विचित्र विधान केले आहे. छत्तीसगडमध्ये कोरिया जिल्ह्यातील खारगव्हाणमध्ये ब्रेकफास्ट योजना सुरू करण्यासाठी दाखल झालेल्या शिक्षणमंत्री प्रेमासाई सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चोरीचा आरोप केला. केंद्र सरकारचे 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान रेल्वेमध्ये चोरी करायला लावत आहेत. मंत्र्यांच्या बॅग पंतप्रधान चोरायला लावत असल्याचे प्रेमसाईसिंग टेकम यांनी म्हटले आहे.
Chhattisgarh Minister&Congress’s Premsai S Tikam on 100 days of Modi govt, in Koriya yesterday, says, “Modi Ji railway mein chori karwa rahe hain aur mantriyon ka bag chori karwa rahe hain. Yeh unki uplabdhi hai.” His bag was allegedly stolen from Amarkantak Express on 17 Sept. pic.twitter.com/Y0aEQ1GNMh
— ANI (@ANI) September 19, 2019
विशेष म्हणजे मंत्री प्रेमसाईसिंग टेकम यांची बॅग अमरकंटक एक्स्प्रेसमधून चोरीला गेली होती. बॅग चोरी झाल्यानंतर त्यांनी हे विधान केले. रायपुरहून पेंड्रा रोडकडे जात असताना अमरकंटक एक्स्प्रेसमधून मंत्र्यांची बॅग चोरी झाली. मंत्री प्रेमसाईसिंग यांना पेंड्रा रोडवर पोहोचताच बॅग चोरी झाल्याची माहिती मिळाली. यानंतर रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनात गोंधळ उडाला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर बॅगचा शोध सुरू झाला, परंतु बुधवारीही त्या पिशवीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. बॅग चोरीबद्दल एफआयआर दाखल केलेला नाही. परंतु रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून बॅग चोरी झाल्यास रेल्वेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.