रायपूर – छत्तीसगड येथील जशपुर जिल्ह्यात लखीमपुर खीरी सारखी घटना घडली आहे. दुर्गा विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना भरधाव कारने चिरडले आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 16हून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तणावग्रस्त जमावाने गाडीला आग लावून चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाठीमागून आलेली भरधाव कार दुर्गा विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना चिरडत असल्याचे दिसते. गौरव अग्रवाल असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Chhattisgarh: A speeding car mowed down people in Pathalgaon of Jashpur dist during Durga idol immersion.
One body brought to the hospital, 16 others hospitalised. 2 of them being referred to other hospitals after x-ray that established fracture: Block Medical Officer James Minj pic.twitter.com/nUfxU5jHDh
— ANI (@ANI) October 15, 2021
जशपुरचे एसपी विजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 16हून अधिक लोक जखमी आहेत. यातील दोघांची प्रकृती जास्त गंभीर आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये एक लाल रंगाची गाडी पाठीमागून येऊन मिरवणूकीतील भाविकांना चिरडत असल्याचे दिसते.
दरम्यान, या घटनेवरून भाजपने छत्तीसगड बघेल सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी म्हंटले, जशपुरमधील हिंदू धार्मिक मिरवणूकील भाविकांना भरधाव गाडीने चिरडले, हिंदूंवर सांप्रदायिक प्रोफाइलिंग आणि हल्ला होण्याचे हे दुसरे उदाहरण आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेशात गांधी भाऊ बहिणींना राजकीय आधार शोधण्यात व्यस्त आहेत, अशी टीकाही मालवीय यांनी केली.