चंद्रपूर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या नामांतरास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने आपल्याला अत्यंत आनंद झाला असून या बहुप्रतिक्षीत नामांतरासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मंत्री मुनगंटीवार आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले की, मी विधानसभेत अनेकदा हा विषय उपस्थित केला होता. उस्मानाबादचे मूळ प्राचीन नाव धाराशिव आहे. परकीय आक्रमकाने दिलेले नाव बदलून मूळ धाराशिव हे नाव द्यावे ही स्थानिक जनतेची मागणी होती.
#AjitPawar : पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल, म्हणाले “मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर..”
औरंगाबाद शहराचे नाव मुघल आक्रमक औरंगजेबाच्या नावावरून पडले होते. त्यामुळे हे नाव बदलणे अत्यावश्यक होते, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, या नामांतरासाठी मी स्वतः ठाकरे सरकारकडे 176 आमदारांच्या सह्यांचे निवेदन दिले होते. वारंवार असंख्य स्मरणपत्रे पाठवली होती. मात्र हे नामांतर घडण्याकरता आमचे सरकार सत्तेवर यावे लागले. भाजपा-शिवसेना युतीचे सरकार म्हणजेच जनतेचे सरकार , हे पुन्हा सिद्ध झाले.