नवी दिल्ली – नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात देशभरात हिंसक विरोध प्रदर्शन सुरू आहे. त्यातच रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शने झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडले आहे. दुसऱ्या दिवशीही जामिया विद्यापीठामधील वातावरण तापलेले आहे.
दरम्यान, या हिंसाचारानंतर तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारे लेखक ‘चेतन भगत’ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत, सरकारला तरुणांच्या संयमाची परिक्षा घेऊ नका असा इशारा दिला आहे.
Crashing the economy. Making jobs vanish. Shutting down Internet. Sending police in libraries. The youth may have patience, but don’t test the limits of it.
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) December 16, 2019
चेतन भगत यांनी म्हंटलं कि, “गडगडणारी अर्थव्यवस्था. कमी नोकऱ्या उपलब्ध असणे. इंटरनेट बंद करणे. पोलिसांना वाचनालयामध्ये घुसवणे. तरुणांकडे संयम नक्कीच आहे. पण त्यांच्या संयमीची परिक्षा पाहू नका.”असं ट्विट चेतन भगतने केलं आहे.