भारतात गेल्या काही दिवसांपासून चित्ता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही दिवसांपूर्वी नामिबियातून 8 परदेशी चित्ते भारतात आणण्यात आले आहेत. 1947 मध्ये चित्ता भारतात शेवटचा दिसला होता, त्यानंतर भारत सरकारने 1952 मध्ये चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केले. मात्र, आता 70 वर्षांनंतर भारतात सिंह, वाघ, बिबट्या यांच्याशिवाय चित्ताही दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये या चित्त्यांना सोडण्यात आले. या चित्त्यांमध्ये पाच माद्या आणि तीन नर आहेत.
पण जयपूरमध्ये कधी काळी चित्ता पाळला जायचा, हे तुम्हाला माहित आहे ? राजस्थानची राजधानी एक असे संपूर्ण परिसर होते, जिथे 1940 पर्यंत चित्ते पाळले जात होते. यानंतर इथून चित्ते नामशेष झाले. असे म्हणतात की जयपूर राजघराण्यातील लोक छंद म्हणून चित्ता पाळत असत.
इतिहासतज्ज्ञ म्हणतात की, जयपूरच्या या परिसरात अफगाण वंशाचे चित्ता प्रशिक्षक राहत होते. जयपूर आणि चित्त्यांशी संबंधित अनेक ऐतिहासिक कथा आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अकबराच्या कारकिर्दीत मुघलांकडे चित्त्यांची संपूर्ण फौज होती.
असे म्हणतात की मुघल सम्राट या चित्त्यांना सोबत घेऊन शिकार करत असत. या चित्त्यांना शिकार करण्याचे योग्य प्रशिक्षण देण्यात आले. मुघल सम्राट अकबर जयपूरजवळील सांगानेरच्या जंगलात शिकारीसाठी यायचा आणि चित्त्यांच्या मदतीने हरणांची शिकार करायचा.
० जयपूरमध्ये होती चित्त्यांची वस्ती
चित्ते फक्त सांगानेरच्या जंगलापुरते मर्यादित नव्हते, तर जुन्या जयपूर शहरात एक चित्त्यांची वस्ती होती जिथे सगळे चित्ते राहत असत. या घराला ‘निजाम महल’ असे नाव देण्यात आले आणि ते एकेकाळी चित्ता ट्रेनर्सचे केंद्र होते. महाराजा सवाई जयसिंग पहिला राज्य करत असताना अफगाणिस्तानातून आलेला वाजिद खान येथे राहत होता. महाराजांनी चित्त्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना खास येथे आणले होते. महाराजांच्या वारसांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली.
० चित्त्यांची घेतली जायची खास काळजी
या चित्त्यांना घरात ठेवत असत आणि त्यांना झोपण्यासाठी मोठ-मोठे कपाट होते. चित्त्यांचं डोकं थंड ठेवण्यासाठी विशेषतः गुलकंद आणि पनीर मांसासोबत खायला दिलं जातं. या चित्तांना महाराजांचे खूप प्रेम मिळाले. चित्त्यांना बैलगाडीतून शिकारीसाठी नेऊन सांगानेरच्या जंगलात नेले जात असे.