लखनौ – केवळ स्वस्तात मिळालेल्या डेटाने लोकांचे पोट भरत नाही तर त्यासाठी पेट्रोल- डिझेलचे दर कमी असावे लागतात. डाळ, तांदुळ, तेल, पीठ आदी गोष्टी स्वस्तात मिळाव्या लागतात अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश याद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
पोटच जर रिकामे असेल तर नेट काय करेल असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की, विदेशात स्थायिक झालेल्या नागरिकांच्या टाळ्या मिळवणे आणि देशात असलेल्या गरीबांच्या ताटात अन्न घालणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.
परदेश दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आपल्या भाषणात भारतात डेटा इतका स्वस्त आहे की अन्य देशांत त्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही अशा आशयाचे विधान केले होते. त्या अनुशंगाने अखिलेश यांनी सरकारवर टीका केली आहे.