पुणे : पुणे येथील सकल जैन समाजाच्या वतीने बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्रामध्ये “चातुर्मास महोत्सव-2019” चे आयोजन करण्यात आले असून देशभरातील जैन बांधवांनी या महोत्सवाला हजेरी लावली आहे. यावेळी युवाचार्य महेंद्रऋषीजी (म.सा.) यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी सात्विक आहाराबाबत खास बातचीत केली.
युवाचार्य महेंद्रऋषीजी (म.सा.) यांनी म्हंटले कि, आहार केवळ मानवच नव्हेतर संपूर्ण जीवसृष्टीच्या ऊर्जेचा स्रोत आहे. आहारासंबंधित समाजात अनेक मतप्रवाह आहेत. परंतु, शास्त्रीय आणि आध्यत्मिक दृष्टिटकोनातून विचार केला तर मानवाचा सात्विक आहार असणे गरजेचे आहे. सात्विक म्हणजे वातावरणाला अनुसरून, आसपासच्या गोष्टींचा विचार करून बनवलेला आहार असणे हे अधिक प्रमाणात चांगले असते. परंतु, मासांहार हा मानवी आहार नव्हे. मानवी शरीराची रचना शाकाहारानुसार बनविण्यात आली आहे. म्हणून आहारात सात्विकतेला स्थान दिले तर आपले हे जीवन अधिक सुंदर बनेल, असे त्यांनी सांगितले.