मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या मोसमात सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचे संकेत स्पर्धा समितीने दिले आहेत. येत्या 29 मार्चला स्पर्धेला प्रारंभ होण्याची केवळ घोषणा होणे बाकी आहे. मात्र संघ मालक तसेच प्रायोजकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
स्पर्धेचा टीआरपी वाढविण्यासाठीच हा बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना चेन्नई सुपरकींग संघाशी होणार असून सामन्यांच्या वेळेत देखील बदल करण्यात येणार असल्याचे वर्तविले जात आहे.