कोल्हापूर – पक्ष चालवणे व प्रशासन चालवणे या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( chandrkant patil criticizes cm uddhav balasaheb thackearay ) यांनी, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठी जन्माला आलेले आहेत.’असं मत व्यक्त केलं. ते कोल्हापुरात बोलत होते.
पाटील यांनी ( chandrkant patil ) यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ( cm uddhav balasaheb thackearay ) कार्यपद्धतीवर देखील जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, ‘एखाद्या विषयाची माहिती घेण्याची, मंत्रिमंडळाला घेऊन एका दिशेनं जाण्याची गरज त्यांना वाटत नाही. कारण ते प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठी जन्माला आलेले आहेत.’
‘पक्ष चालवणे आणि प्रशासन चालवणे हे पूर्णत: वेगळे विषय आहेत. प्रशासन चालवताना प्रचंड वेळ द्यावा लागतो. अनेक जुने संदर्भ घ्यावे लागतात. सर्वोच्च न्यायालयाच्या १०० निर्णयांचा अभ्यास करावा लागतो किंवा त्याबद्दलची माहिती संबंधितांकडून घ्यावी लागते,’
यावेळी बोलताना पाटील यांनी ( chandrkant patil ) वीज बिल वाढीच्या विषयावरील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचा संदर्भ देत, ‘वीज बिलात सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भूमिका होती. त्यांनी त्यासाठीची फाईल अर्थमंत्री अजित पवारांकडे पाठवली. निधी नसल्याचं म्हणत अजित पवारांनी ती फाईल मागे पाठवली. या ठिकाणी नेता म्हणून उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप करायला हवा होता. जनतेला दिलासा देणं आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे ५०० कोटी कमी करा. ते इथे वळवा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं,’ असं म्हंटलं.
प्रशासनाचा अनुभव व मनाची तयारी नसतानाही उद्धव ठाकरे ( cm uddhav balasaheb thackearay ) मुख्यमंत्री झाल्याचा दावाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.