नवी दिल्ली – भारत चंद्रावर इतिहास घडवण्याच्या अत्यंत समीप पोहोचला आहे. चंद्रयान -2 चे लॅंडिंग मॉड्यूल ‘विक्रम’ शनिवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर ऐतिहासिक सुखरूप लॅंडिंग करण्याचा अंतिम टप्प्यात आहे. भारताची ही दुसरी चंद्र मिशन चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुव क्षेत्रावर प्रकाश टाकेल जिथे आजपर्यंत कोणत्याही देशाने पाय ठेवला नाही. त्यामुळे हा भारातासाठी एक ऐतिहासिक दिवस असणार आहे. त्या ऐतिहासिक क्षणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’ आतूर आहे. चंद्रावरील यशस्वी लॅंडिंगमुळे रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत चौथा देश बनेल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 70 विद्यार्थ्यांसह इस्रोच्या बंगळुरू केंद्रात हे पाहणार आहे. यासह अमेरिकन एजन्सी नासासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेवर आहे. लॅंडर सध्या चंद्राच्या पृष्ठभागापासून जवळ आहे. येथून त्याचा शेवटचा टप्पा सुरू होईल. इस्रो अभियंत्याने लँडिंगची जागा ठरवली असून त्या ठिकाणी चांद्रयान उतरण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर राहील आणि चंद्राची छायाचित्रं आणि तिथल्या स्थितीबद्दल शास्त्रज्ञांना माहिती देईल.
Behind the scene images of #Chandrayaan2 mission. The final descent of #Chandrayaan2 will take place on the Lunar South Pole, tonight. pic.twitter.com/fjUjNNxgC8
— ANI (@ANI) September 6, 2019
Details of India’s #Chandrayaan2 Mission: VIKRAM- #Chandrayaan2’s lander, is named after Dr Vikram A Sarabhai, the Father of the Indian Space Programme. It is designed to function for one lunar day, which is equivalent to about 14 Earth days. pic.twitter.com/d5ncwYgBLY
— ANI (@ANI) September 6, 2019