चंद्रपूर- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 210 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 8 हजार 709 वर गेली आहे. आतापर्यंत 5 हजार 51 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 528 बाधितांवर उपचार सुरू आहे. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 80 बाधित, पोंभूर्णा तालुक्यातील 1, बल्लारपूर तालुक्यातील 33, चिमूर तालुक्यातील 13,मूल तालुक्यातील 11, गोंडपिपरी तालुक्यातील 5, कोरपना तालुक्यातील 4, ब्रह्मपुरी तालुक्यातील 4, नागभीड तालुक्यातील 21, वरोरा तालुक्यातील 14,भद्रावती तालुक्यातील 11, सावली तालुक्यातील 1, सिंदेवाही तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 10 असे एकूण 210 बाधित पुढे आले आहे.
दरम्यान, या वाढत्या प्रादुर्भावामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पून्हा 5 दिवसाचा जनता कर्फ्यू जारी केला आहे. 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत सगळे अत्यावश्यक सुविधा सोडल्यास सगळी दुकानं बंद राहणार आहे.