कोल्हापूर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्या वरती शरसंधान साधले आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना भेटणं हा केवळ योगायोग नसल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.
दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात कोरेंच्या घरी बोललेलं वक्तव्य नाकारलं नसून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे गेले असते मात्र फडणवीस हे क्वारंटाईन असल्याने दादा एकटेच गेले असावेत अस मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसंच परवा आम्ही नावं दिल्यावर काल भेटण्याचे दुसरे कोणतं कारण असू शकतं अशी टीका केलीय.
दरम्यान चंद्रकांतदादा पाटील यांचा तोल ढासळला आहे की काय असं वाटतं असल्याचं देखील मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. एका मराठी मुलीचं कुंकू पुसण्यास कारणीभूत असलेल्या व्यक्तीच्या मागे उभा राहता? असा सवाल करत अर्णब यांना पत्रकार म्हणून अटक करण्यात आली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.