मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाकडून अटक झाल्यानंतर त्यांच्या मागणी राजीनाम्याची भाजप नेत्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येऊ लागली आहे. यावरूनच विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांनी आंदोलन केले होते.
भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी करण्यात आली. या होळीचे दहन केले. यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.#Holi #Pune #BJP pic.twitter.com/hcA8kV7ihe
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 17, 2022
यातच राज्यभरात आज होळीचा उत्साह केला जात असतांना होळीचं निमित्त साधून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला जातोय. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’वाईट प्रवृत्ती जाळण्याचा दिवस म्हणजे होळी. त्यामुळे आज आम्ही ‘देशद्रोही दाऊद सरकार’ची होळी करतोय’ असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.