पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे दीड लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणे तसेच प्राधान्याने धोरणे आखले जातील. राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांना आनंददायी, सुरक्षित आणि निश्चिंत आयुष्य जगण्यासाठी नव्याने ज्येष्ठ नागरिक धोरण आखण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे कोथरूडमधील उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
प्रचार फेरी “हाऊस टू हाऊस’ गाठीभेटी आणि नागरिकांशी ते संवाद साधत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांची ते माहिती देत आहेत, तर हेच विकासपर्व कायम राखण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहनही ते करत आहेत.
ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून ज्या सरकारने नवीन ज्येष्ठ नागरिक धोरणाचा आराखडा आखला आहे. त्याऐवजी 60 वर्षांवरील नागरिकांना हा दर्जा देण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठांचे आयुष्य निरोगी आणि आनंददायी अनेक धोरणे आखण्यात आली आहेत. अंथरुणाला खिळून राहिलेल्या ज्येष्ठांसाठी स्वतंत्र, अद्ययावत निवासस्थाने, शहराजवळच हॉलिडे होम, मोफत बस सेवा आदी योजनांचा समावेश आहे. पानशेत पूरग्रस्तांच्या सर्व मागण्या सोडवण्यात भाजपला यश मिळाले आहे, असे पाटील यांनी नमूद केले.
पाटील यांच्या प्रचारार्थ नुकतीच पूरग्रस्त वसाहत प्रभाग क्र 13 मध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. पूरग्रस्त वसाहतीतील साई मंदिरापासून पदयात्रेला प्रारंभ आणि शनि-मारुती मंदिरात या समारोप झाला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका, माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक दीपक पोटे आणि जयंत भावे आदी उपस्थित होते.