मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी राजकीय आरोप-प्रत्यारोपाचं वादळ सुरू झालं आहे. तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, केरळ आणि गोव्यासहित गुजरातला तडाखा दिला आहे.
या वादळामुळं चार राज्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातला तातडीने एक हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यमुळं उर्वरित राज्यांच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा विरोधी पक्षाकडून केला जात आहे. या आरोपांवर भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा आहे. इतकंच नाही तर मोदींचा महाराष्ट्र दौरा ठरला होता. पण हवामान पाहता त्यांना सल्ला दिला गेला की जाणे योग्य नाही म्हणून त्यांनी दौरा रद्द केला. त्यांनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा. त्यांनी प्रत्येक मृताला मदत जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातले पण लोक येतात.”असंही ते म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले,’देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी जमिनीवरून प्रवास केला. त्यांचा प्रवास हवेतून नाही तर जमिनीवरून होता.फडणवीस यांचा दौरा दोन दिवसांत पूर्ण पण होत आला आहे. उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले.त्यांचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी शुभेच्छा.” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौऱ्यावर निशाणा साधला.