राजकीय चर्चांना आले उधाण
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.
दरम्यान, राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी जवळपास 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे राजकीय तर्कांनाही उधाण आले आहे. राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामध्ये या भेटीत निवडणुकांनंतरच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.