पुणे – यंदा जिल्ह्यात प्रथमच दोन टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणुक झाली आहे, तर उद्या (दि.29) मावळ आणि शिरूरसाठी मतदान होत आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी पुणे अथवा लोकसभा मतदारसंघात मतदान केले आहे. अशा मतदारांची नावे पुन्हा मावळ व शिरूर मतदारसंघात असतील, तर अशा मतदारांकडून पुन्हा मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार मतदान रोखणे जिल्हा प्रशासनापुढे असणार आहे..
जिल्हा प्रशासनाकडून मयत, दुबार, स्थलांतरीत अशी यादी तयार करण्यात आली आहे. या यादीनुसार सुमारे दिड लाख मतदारांची नावे या यादीत आहे. मतदान केंद्रनिहाय ही यादी तयार करण्यात आली असून ती मतदानाच्या वेळी केंद्रांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या यादीत ज्या मतदारांची नावे आहेत, त्या मतदारांकडे दोन ओळखपत्रे मागितली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.