राजगुरूनगर -चाकण येथे करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शनिवारी (दि. 18) बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार भरणार नाही.
शनिवारचा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.