शासन स्तरावर हालचाली : समितीच्या अहवालाकडे लक्ष
पुणे – राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) तालुकास्तरावर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तज्ज्ञ समितीचा अहवाल आला, की सीईटी घेण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा घेण्याची सुरुवात केली आहे. त्यानुसार सीईटी कधी होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विधी हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएड अशा अभ्यासक्रमांच्या सीईटी होणे बाकी असून, त्यासाठी सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.