मेलबर्न – भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या बाबतीत एक विलक्षण योगायोग घडत आहे. आजवर रहाणेने ज्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली आहे तो सामना भारतीय संघाने कधीही गमावलेला नाही. असे यापूर्वी 11 सामने ठरले असून या सामन्यातही रहाणेने शतक केले असून भारतीय संघ यशाचे बारावे शिखर गाठण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
जेव्हा रहाणेने शतक फटकावले आहे तेव्हा भारताने सामना कधीच गमावलेला नाही. रहाणेने या कसोटीत 12वे शतक साकार केले. याआधी 11 शतकी खेळीत 8 सामने भारताने जिंकले आहेत तर, 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.
रहाणेची शतके व सामन्यांचे निकाल
118 विरुद्ध न्यूझीलंड- सामना अनिर्णित
103 विरुद्ध इंग्लंड- विजय
147 विरुद्ध ऑस्ट्रेलिया- सामना अनिर्णित
126 विरुद्ध श्रीलंका- विजय
127 नाबाद 100 विरुद्ध दक्षिण आफ्रिका- विजय
108 नाबाद विरुद्ध वेस्ट इंडिज- सामना अनिर्णित
188 विरुद्ध न्यूझीलंड- विजय
132 विरुद्ध श्रीलंका- विजय
102 विरुद्ध वेस्ट इंडिज- विजय
115 विरुद्ध दक्षिण आफ्रिका- विजय