नवी दिल्ली/ अलाहाबाद/मुंबई : राम जन्मभूमी बाबरी मस्जीद वादावर कधीही निकाल जाहीर होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर देशात शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच सरकारनेही उत्तर प्रदेशात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आठ तात्पुरते कारागृह उभारण्यात आले असून सुरक्षा दलातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आयोध्येत दहशतवाद प्रतिबंधात्मक पथक, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि स्थानिक अन्वेषण विभागाचे अधिकारी तैतात करण्यात आले आहे.
देसाचे सरन्यायधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठ येत्या काही दिवसांत आयोध्येतील 2. 77 एकर क्षेत्राच्या वादग्रस्त जागेचा निकाल देण्याची शक्यता आहे. याबाबत सलग 40 दिवस सुनावणी झाली होती. या निकालाने गेले तीन शतक सुरू असणारा संघर्ष मिटण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायलयाने 2010मध्ये निर्मोही आखाडा, राम लल्लाचे प्रतिनिधी आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात जागेचे समान वाटप करण्यात यावे असा निकाल दिला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायलयात दाद मागण्यात आली होती.
देशावर प्रभाव टाकू शकणाऱ्या या निकालाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांशिवाय उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.
काही प्रमुख उपाय योजना
* केंद्र सरकारचे सर्व राज्य सरकारना अती सतर्कतेचे आदेश. संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्याचे आदेश.
* केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्तर प्रदेशात विशेषत: आयोध्येत चार हजार निमलष्करी दलाचे जवान तैनात.
* उत्तर प्रदेशच्या आंबेडकर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात आठ तात्पुरते कारागृह उभारले.
* दहशतवाद प्रतिबंधात्मक पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), आणि स्थानिक अन्वेषण विभागाचे अधिकारी आयोध्येत तळ ठोकून.
* उत्तर प्रदेशमध्ये सर्व 75 जिल्ह्यातील पोलिसांसह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या रजा 30 नोव्हेंबर पर्यंत रद्द.
* समाजमाध्यमांवर तपास यंत्रणांचे बारीक लक्ष. विद्वेष पसरवणारे संदेश आढळल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई.
* महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह संदेशावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना.
* मिरतमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर निकाल काहीही लागला तरी शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यासाठी इमामांची भेट
* सर्वोच्च न्यायलयाच्या या खडपीठाचे सदस्य असणारे न्यायाधिश अशोक भूषण यांच्या अशोक नगर येथील निवासस्थानाबाहेरील बंदोबस्तात वाढ.
* राम जन्मभूमी न्यासाने दगडवाहून नेण्याची कार्यशाळा थांबवली.