नवी दिल्ली – देशात करोनाचा थैमान थांबायच नाव घेत नाही. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहेत. तसेच व्हेंटिलेटर्स देखील कमी पडत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून तसेच आरोग्य सुविधांच्या अभावी लोकांचा करोनाने मृत्यू होत आहे. मात्र असं असतांना सुद्धा दिल्लीत पंतप्रधान निवासाचे काम वेगात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Central Vista is criminal wastage.
Put people’s lives at the centre- not your blind arrogance to get a new house!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 7, 2021
काय म्हणाले राहुल गांधी
“दिल्लीत पंतप्रधान निवास सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्ययच. महामारीच्या काळात लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको”, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.