मुंबई: दिनांक २२.३.२०२० रोजी म्हणजेच रविवारी जनता कर्फ्यू लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दिनांक २२.३.२०२० रोजी पहाटे ४.०० वाजेपासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत मध्य रेल्वेतून प्रारंभ होणा-या (originating trains) लांब पल्लाच्या सर्व मेल / एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत.
तसेच मध्य रेल्वेवर दि २१ आणि २२.३.२०२० च्या मध्यरात्री १२.०० वाजेपासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत चालणाऱ्या सर्व मेमु, डेमू सह सर्व पॅसेंजर गाड्या (प्रवासी गाड्या) रद्द केल्या आहेत. उपनगरी गाड्यांच्या बाबतीत मुंबई विभागातील सुमारे ११०० उपनगरी गाड्या आणि पुणे विभागातील १५ उपनगरी गाड्या दिनांक २२.०३.२०२० रोजी धावतील.
अर्थात मुंबई विभागातील एकूण गाड्यांच्या अंदाजे ६०% गाड्या चालविण्यात येतील. तसेच अमन लॉज-माथेरान दरम्यानच्या सर्व सेवा दिनांक २२.०३.२०२० रोजी रद्द राहतील.या विषयची सर्व माहिती मध्य रेल्वेची वेबसाईट www.cr.indianrailways.gov.inवर उपलब्ध आहे.