नवी दिल्ली – देशात करोना संसर्ग थैमान घालत आहे. दैनदिन मृत्यचं प्रमाणही तीन हजारांच्या पुढं गेल आहे. या पार्श्वभूमीवर देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लसी उपलब्ध होत नसल्याने अडचण येत आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ आता कर्नाटकने देखील लसींचा पुरवठा होत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे देशात लसीचा तुटवडा नसल्याचं सांगणारं केंद्र सरकार खोटं बोलत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशात लसींचा साठा पुरेसा आहे, असे केंद्र सरकार सांगत आहे. पण अनेक राज्यांत लस नसल्याने लसीकरण होत नसल्याचं चित्र आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र लस नसल्याने बंद पडले आहेत. आता भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही केंद्राकडून लस पुरवठा झाला नसल्याची कबुली दिली आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन सातत्याने लसींचा तुटवडा नसल्याचा दावा करत आहेत.
We have not been supplied with the vaccines till now. Once the vaccines are supplied we will start the vaccination for those above 18 years of age: Karnataka CM BS Yediyurappa pic.twitter.com/oF7Anxi8er
— ANI (@ANI) April 30, 2021
दरम्यान केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठाच झाला नाही अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली आहे. तसेच जेव्हा केंद्राकडून लसींचा पुरवठा होईल तेव्हा 18 ते 45 वर्षाच्या नागरिकांना लस दिली जाईल असे येडियुरप्पा म्हणाले आहेत.