मुंबई – सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून भारतीय सीमेत चीनकडून पुलाचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. चीनकडून भारतीय भूमी हडप करण्याच्या घटनेला केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला चीनच्या माध्यमांकडून काही व्हिडीओ दाखवण्यात आले. ज्यामध्ये गलवान खोऱ्यात चीनचा ध्वज लावण्याचे दाखवण्यात आला. सीमेवर शांतता राहावी याबद्दल कोणाच्या मनात दुमत नाही. मात्र भारतीय भूमी चीन हडप करेल आणि त्यावर आम्ही शांत राहू, हे चालणार नाही.
त्यामुळे केंद्र सरकारने हा विषय गंभीरपणे घ्यायला हवा. असे अतिक्रमण होणे योग्य नाही. आपण असेच शांत राहिलो तर भारतीय भूमी हडप करण्याची चीनची भूमिका सफल होताना दिसेल, असे मत नवाब मलिक यांनी मांडले.