नवी दिल्ली – दिल्ली सरकारने नागरीकांसाठी घरपोच रेशन पोहोचवणारी योजना राबवण्याचे योजले होते. पण त्याला केंद्र सरकारने मोडता घातला आहे. पुढील आठवड्यापासून ही योजना सुरू होंणार होती. पण केंद्र सरकारने विविध कारणे पुढे करून या योजनेला अनुमती देण्यास नकार दिला आहे अशी माहिती आम आदमी पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात लोकांना घरपोच रेशन देण्याची योजना राबवण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता याच आठवड्यात केली जाणार होती. पण आता केंद्र सरकारच्या मनाईने योजनाला मोठी बाधा आली आहे.
मुख्यमंत्री घर घर रेशन योजना असे या योजनेचे नाव होते. या योजनेतील भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी आणि लोकांना विनासायास अन्नधान्य मिळावे यासाठी ही योजना महत्वाची होती असे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे.