मुंबई – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या घरावर सोमवारी सकाळी छापा टाकण्यासाठी सीबीआयचे पथक पोहोचले. नोकरीसाठी जमीन प्रकरणी सीबीआय राबडी देवीची चौकशी करत आहे.यावरूनच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील भाष्य केले आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल हे सतत केंद्रीय तपास यंत्रणांनबाबत भाष्य करताहेत.लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर झालेल्या सीबीआय हल्ल्याबाबत देखील केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व अपमानास्पद असल्याचे केजरीवाल यावेळी म्हणाले आहेत. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मीसा भारती यांच्यासह 10 हून अधिक आरोपी आहेत.
सीएम केजरीवाल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले- “हे चुकीचे आहे, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर छापे टाकणे योग्य नाही. मी काल म्हणालो की, ज्या राज्यांमध्ये विरोध आहे तेथे छापा टाकणार असा ट्रेंड आहे. ईडी, सीबीआय किंवा राज्यपाल यांच्यामार्फत विरोधकांना त्रास दिला जात असल्याचे देखील केजरीवाल यावेळी म्हणाले.