नवी दिल्ली – देशात जातनिहाय जनगणना केली जावी, अशी मागणी जेडीयु म्हणजेच संयुक्त जनता दल पक्षाने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. या पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज दिल्लीत शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
जेडीयुचे अध्यक्ष राजीव रंजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, देशातील नागरिकांची जातनिहाय जनगणना केली जावी, अशी मागणी बिहार विधानसभेत या आधी दोन वेळा एकमताने करण्यात आली आहे.
त्यावेळी भारतीय जनता पक्षानेही या मागणीला पाठिंबा दिला होता, असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. या संबंधात आम्ही आता पंतप्रधानांनाही भेटणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले. त्यासाठी जेडीयुने पंतप्रधान कार्यालयाकडे वेळ मागितली आहे.