कानात आवाज येणे, ऐकू कमी येणे, तोल जाणे, चक्कर येणे, डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन) सर्वसाधारण रूग्णांच्या कानामध्ये सूं सूं, रातकिड्यांच्या आवाजाप्रमाणे, भांडी पडल्याप्रमाणे, शिट्टी वाजल्याप्रमाणे, इंजिनाच्या आवाजासारखे निरनिराळ्या प्रकारचे आवाज सतत येतात, काही जणांना आवाजाचा इतका त्रास होतो, की आत्महत्या करावीशी वाटते.
कर्णनाद म्हणजे कानात वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येणं, हा आवाज कमीजास्त होत असतो. साधारणपणे शांतता असताना त्याची तीव्रता जास्त जाणवते, याला वयाची मर्यादा नाही. 15 ते 20 वर्षे वयाच्या व्यक्तींमध्येही हा त्रास आढळून आला आहे. वय वर्षे 45 आणि पुढील व्यक्तींमध्ये याचं प्रमाण जास्त असल्याचं आढळतं. ज्यांना कर्णनादाचा त्रास असतो, त्यांची कमी ऐकू येण्याचीही तक्रार असते.
शरीररचनेनुसार कान, नाक, घसा, डोकं, दात यांचा जवळचा संबंध आहे. यांपैकी एका अवयवाला त्रास झाल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या अवयवावर दिसून येतो, आमच्या पाहणीत असे दिसून आले आहे, की ज्यांना सर्दीचा वारंवार त्रास होतो, ज्यांचे नाकाचं मांस, हाड वाढलं आहे अशा व्यक्तींना, त्याचप्रमाणे ज्यांनी दातांवर उपचार करून घेतले आहेत, दाढा काढल्या आहेत, रूट कॅनॉल केलं आहे, ज्यांना टॉन्सिल्सचा त्रास वारंवार होतो, ज्यांना अर्धशिशी, मानेच्या मणक्याचा त्रास आहे, वारंवार चक्कर येते, ज्या व्यक्ती जास्त आवाज होणाऱ्या ठिकाणी काम करतात, ज्यांनी एखाद्या आजारासाठी अनेक महिने औषधोपचार घेतले आहेत, रात्रीच्या वेळी विमान उतरताना किंवा उड्डाण करताना होण्याचा आवाज, एखाद्या गोष्टीची ऍलर्जी, त्यामुळे घशाची सूज अशी अनेक कारणं यामागे आहेत.
आयुर्वेदानुसार वात, कफ दुष्टी झाली असता कानात आवाज येणे, ऐकू कमी येणे, घशाला सूज येणे, वारंवार सर्दी-खोकला होणे हा त्रास संभवतो. आमच्याकडे आलेल्या रूग्णांचा अभ्यास करून कान व नाकात घालण्यासाठी तसेच पोटातूनही घेण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धत तयार केली आहे. त्यामुळे कानात येणारे आवाज, डोकेदुखी, चक्कर, अर्धशिशी, ऐकायला कमी येणं या तक्रारी हळूहळू कमी होण्यास मदत होते. यात पंचकर्म करण्याची आवश्यकता नाही.