नगर -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवून शहरातून कॅन्डल मार्चसह संविधान रॅली काढण्यात आली.
धर्मांध सरकारमुळे देशात मुलगी व संविधान धोक्यात असल्याचा आरोप करीत हिटलरशाही भाजप हटाव, लोकशाही बचावच्या घोषणा देण्यात आल्या. तर हाथरस येथील घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कॅंडल मार्च व संविधान रॅलीचे प्रारंभ करण्यात आले. यामध्ये आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, पवन भिंगारदिवे, नईम शेख, संतोष पाडळे
सुशील म्हस्के, विनीत पाडळे, राकेश चक्रनारायण, भिम वाघचौरे, दिनेश पाडळे, आकाश काळे, आकाश पाडळे, अमित गायकवाड, सोनू काळे, आकाश भालेराव, कार्तिक म्हस्के, सोनू गायकवाड, विनोद पाडळे, वैभव भालेराव, हर्षद पेंढारकर, उमेश गायकवाड, आदी सहभागी झाले होते.
हातात मेणबत्त्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पिडीत तरुणीची प्रतिमा घेऊन नगर-पुणे महामार्गावरुन निघालेल्या या रॅलीत मोदी प्रणित भाजप सरकार व उत्तर प्रदेशातील योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.