आजची युवा पिढी लहान-मोठ्या कारणांनी नकारात्मक विचारांना , आत्महत्येला, निराशेला सहज मारक ठरतात.हे आयुष्य माझ्या वाट्याला का म्हणून रडत बसतात. कॅन्सर अस म्हटलं तरी थरकाप होतो. कॅन्सर झाला की “आता संपलं सारं काही ” असे समजून अनेकजण खचतात. अश्विनी अकोलकर ह्या फर्ग्युसन महाविद्यालातून B.sc झालेल्या युवतीची जीवन भरारी नेत्रदीपक तर आहेच त्यापेक्षा अधिक प्रेरणादायीआहे.
साकोरमा (एक प्रकाराचा कर्करोग) या दुर्धर व्याधीची सुरूवात अचानक एका क्षणी (2014) क्षुल्लक पायाच्या दुखण्यानं लक्षात आली.तिथून सुरू झाला विविध उपचारांचा भडीमार. कधी शस्त्रक्रिया तर कधी वेदनादायक केमोथेरपी अशा अत्यंत खर्चिक वेदनादायी अनुभवातून जाताना आश्विनीवर आभाळचं कोसळले. पण धैर्यानं, सहनशीलतेने अश्विनी मात्र लढाऊ वृत्तीनं परावर्तित झाली.सलग पाच वर्षे विविध शस्त्रक्रिया, केमोथेरपी यांनी शारीरिक वेदनांचा मारा सहन करत असतानाही ही धाडसी पोर लढाऊ वृत्तीने उभी राहिली. हळूहळू तिने आजार, आगारातील उपचारांमुळे आलेल्या शारीरिक व्यथा यांवर मात करीत प्रचंड आत्मविश्वासाने जगण्याचे सार बदलून टाकले. B.sc झाल्यावर तिने एक नोकरी नाकारून, आई-वडीलांच्या प्रेमापोटी घरीच शिकवण्या घेवू लागली.कसलीही आर्थिक अभिलाषा न बाळगता, आपल्या आजाराचा विसर पडावा म्हणून क्लासेस घेताना शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमेतीची कमाल करून दाखवते.
माझ्यासारखा अनेकांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे या विचारांनी भारलेली असून, “होय!मी शतायुषी होणार” या तिच्या आत्मकथातून सकारात्मक ऊर्जा मिळते.
– प्रियांका निवडुंगे,
कॉलेज रिपोर्टर,
सावित्रीबाई फुले महाविद्यालय, तळेगाव