अचानक साक्षात्कार कसा?
पुणे – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सर्व परवानगी घेत मागील चार वर्षांपासून या प्रकल्पाला विविध परवानगी घेण्याचे काम सुरु आहे. निती आयोगाने सुद्धा परवानगी दिली असून 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळणे बाकी असताना अचानकपणे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग मंजूर झालेला प्रकल्प अचानक रद्द करणे ही दुदैवाची गोष्ट आहे.
पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासाला यामुळे खीळ बसणार आहे. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार कसा झाला आहे, असा सवाल डॉ. कोल्हे यांनी केला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. एकीकडे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया असा गाजावाजा करत असताना पहिल्यांदा ब्रॉडग्रेज होणारी पहिली ही हायस्पीड रेल्वे आहे, असे असताना सुद्धा इंडियन टेक्नॉलॉजी आपण नाकारत आहोत आणि जी परदेशी टेक्नॉलॉजी आहे, जी तीन ते चार पट महाग आहे. त्या टेक्नॉलॉजीला रेड कार्पेट अंथरत आहोत, मग मेक इन इंडिया कुठे गेले? असा सवाल डॉ. कोल्हे यांनी केला आहे.
..तर फिरू देणार नाही
जर हा प्रकल्प राजकीय हेतूने गेला असेल आणि त्या राजकीय पक्षाच्या कुठल्याही नेत्याला मतदार संघात फिरता येणार नाही. कारण या मतदार संघातील लोकांनी 25 वर्षे यासाठी काढले आहेत. त्यामुळे जर यात कोणी राजकीय हस्तक्षेप केला तर त्याला नागरिक मतदार संघात फिरू देणार नाही, असा इशारा डॉ. कोल्हे यांनी यावेळी दिला.