लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ‘योगी आदित्यनाथ’ यांनी आज (१जून) पासून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत कि “कॅबिनेट बैठकी दरम्यान कोणतेही नेते आपले मोबाईल फोन घेणून येणार नाही”. म्हणजेच, यापुढे राज्यातील कोणत्याही मंत्र्याला कॅबिनेट बैठकी दरम्यान आपले मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही. अशी सूचना योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
सुत्र्यांच्या माहिती नुसार, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी हा निर्णय इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे हॅकिंग आणि त्यांचा गैर वापर होऊ नये, यासाठी घेतला आहे. यापूर्वी कॅबिनेट मध्ये सर्व मंत्री आपले मोबाईल फोन घेऊन जात असे मात्र, ते फोन त्यांना बंद किंवा सायलेंट करून ठेवावे लागत.