मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे गटाचे नेतेही राज्यपाला यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याच मुळे आता राज्यपालांना लवकरात-लवकर केंद्रात पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागलू आहे.
दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशना पूर्वीच राज्यपालांना बदलण्याची शक्यता आहे. 5 डिसेंबर ते 19 डिसेंबरच्या दरम्यान राज्यपालांच्या बदलीची शक्यता आहे. पाच डिसेंबरला गुजरात विधानसभा मतदानाचा दुसरा टप्पा आहे. तर, येत्या 19 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
आणि त्यापूर्वीच त्यांची बदली होण्याची शक्यता आहे. अन्यथा यंदाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी हा मुद्दा प्रामुख्यानं उचलणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच सध्या भगतसिंह कोश्यारी यांना बदलण्याच्या हालचाली जोर धरू लागली आहे.
कोश्यारींचं विधान काय होत…!
एका कार्यक्रमात कोश्यारी म्हणाले होते.., “तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील’, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होत.