पिंपरी – दिवसेंदिवस शहरात मोबाइल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढतच असून मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांची सेवा मात्र पूर्णतः विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मोबाईल सेवा देणाऱ्या जवळपास सर्वच कंपन्यांचे ग्राहक “कॉलड्रॉप’मुळे त्रस्त आहेत.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर यासह शहरातील सर्वच भागात ही समस्या जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून फोनच लागत नसल्याची तक्रार नागरीक करत आहेत. वारंवार फोन करुनही फोन न लागणे, फोन लागला तरी आवाज ऐकू न येणे, अनेकदा बोलता बोलता फोन कट होत आहेत. तसेच रिंग जात नाही अशा अनेक तक्रारी निर्माण झाल्या आहेत.
कंपन्या चांगली सेवा देण्याचे केवळ आश्वासन देतात. यामुळे अनेकांनी आधीच्या कंपनीची सेवा बंद करुन अधिक पैसे मोजत मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी करुन घेतली. तरी देखील हीच समस्या कायम असल्याची स्थिती आहे.