पुणे – जामिया मिलिया विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या कारवाईच्या निषेध करण्यासाठी मंगळवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी संघटनांनी निदर्शने केली. आंदोलनात शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थी, संघटनांचे पदाधिकारी तसेच जामिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. लाठीचार्जची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “काब’ आणि “एनआरसी’ हे कायदे देश तोडण्यासाठी आणले गेले आहेत, असा आरोप स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनाइजेशन ऑफ इंडियाचे नदीम रसूल यांनी यावेळी बोलताना केला आहे.