नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात झालेल्या गोळीबार प्रकरणी आम आदमी पार्टीला (आप) जबाबदार धरले आहे.
ते म्हणाले की, “शाहिनबाग गोळीबार प्रकरणात आम आदमी पक्ष राजकारण करीत आहे”. या गोळीबाराचा काहीच परिणाम झाला नसून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचा विजय होईल. “भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत असून विरोधकांचे धाबे दणाणले आहे.