नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. त्याला हिंसक वळण लागले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे दारियागंज परिसरातील हिंसाचार प्रकरणी 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींना व्हिडीओ फुटेजच्या आधारावर अटक गेले. सर्व आरोपी दारियागंज परिसरातील स्थानिक रहिवासी असून यापैकी चार आरोपींवर हे गुन्हेगारी पार्श्वभूमीतील आहे.
तत्पूर्वी,मूझफ्फरनगर, बहरीच, बुलंदेश्वर गोरखपूर, फिरोझाबाद, अलिगढ, मिरत, कानपूर आणि फारूखाबाद येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. पोलिस महासंचालक ओपी. सिंह यांनी राज्यात किमान सहा जण या हिंसाचारात मरण पावल्याचे मान्य केले.