दिल्ली : देशातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरील हिंसाचाराचा फटका पर्यटन उद्योगालाही सहन करावा लागला आहे. देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहालला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी त्यांचे बुकिंग रद्द केले.
डिसेंबरमध्ये लोकसभेत नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर होताच, देशात हिंसाचार उसळ होता. हिंसाचारात जवळपास सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याचा परिणाम म्हणून किमान सात देशांनी आपल्या नागरिकांना भारतात जाऊ नये असा सल्ला दिला आहे.
याचा थेट परिणाम पर्यटन क्षेत्रावर दिसून येत आहे. सुमारे दोन लाख देशी-विदेशी पर्यटकांनी ताजमहालला भेट देण्यासाठी आग्रा टूर हॉटेल आणि इतर बुकिंग रद्द केली आहे. विशेष पर्यटक पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी डिसेंबरमध्ये पर्यटकांची संख्या 60 टक्क्यांनी घसरली आहे.
ताजमहालवर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येची माहिती ताजमहल पर्यटन पोलिसांना ठेवावी लागते. पोलीस निरीक्षक दिनेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय आणि विदेशी पर्यटकांकडून सुरक्षा व्यवस्थेविषयी कंट्रोल रूममध्ये सतत फोन येत होते. आम्ही त्यांना सुरक्षिततेचे आश्वासनही दिले होते, पण देशाची परिस्थिती पाहून बर्याच पर्यटकांनी ताजमहला भेट देण्याचे टाळले.
90 टक्के पर्यटकांची आसाममधील बुकिंग रद्द
आसाम पर्यटन विकास महामंडळाचे प्रमुख जयंत मल्ला बरुआ यांच्या माहितीनुसार, राज्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुमारे पाच लाख पर्यटक येतात. परंतु देशात झालेल्या हिंसाचारामुळे 90 टक्के पर्यटकांनी आसामकडे पाट फिरवली आहे.