झारखंड : लोहरदगा जिल्यातील बारा तालाब भागात ‘का’ कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चावर विरोधी गटाने दगडफेक केली असून अनेक वाहने पेटून देण्यात आली आहे.
दोन गट समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. या भागात जमावबंदी लावण्यात आली आहे.
नागरिकत्व कायद्यासंदर्भात देशभरात तणावाचे वातावरण आहे. कायदा परत घेण्यासाठी दिल्लीच्या शाहीन बागेत धरणे आंदोलन सुरू आहे. शाहीन बागच्या धर्तीवर पुण्यातही निदर्शने सुरु आहेत.
(सविस्तर तपशील प्रतीक्षेत )