वॉशिंग्टन : विविध प्रकारचे आधुनिक रोग आणि मानसिक चिंता यामुळे मानव जात त्रस्त झाली असली तरी त्याचा कोणताही परिणाम माणसाच्या आयुर्माणावर झालेला नाही असे समोर आलेले आहे.
एका संशोधनानुसार या शतकाच्या अखेरीपर्यंत माणसाचे आयुर्मान तब्बल एकशे तीस वर्षापर्यंत वाढणार आहे . गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये जगात सर्वत्रच जास्त काळ जगणार्या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केला आहे.
जर्मनीतील मॅक्स प्लेयर या संस्थेच्या मदतीने वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी उपलब्ध माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे . 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत माणसाचे सरासरी आयुर्मान 125 ते 130 असेल असे या संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधनाच्या निमित्ताने संशोधकांनी कॅनडा जपान ब्रिटन अमेरिका आणि युरोपातील काही देशांमधील शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ जगलेल्या लोकांच्या माहितीचा आधार घेतला.
संशोधकांच्या टीमचे नेते मायकल पीयर्स यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जगात सध्या 100 पेक्षा जास्त वय असणारे दहा लाख लोक आहेत. 110 पेक्षा जास्त वय असणारे सहाशे लोक आहेत. जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती होण्याचा मान जपानमधील केन तानाका या महिलेला मिळाला असून तिचे वय 118 आहे.
लोकांना जर दीर्घायुष्य हवा असेल तर त्यांनी स्वच्छ पाणी प्यावे आणि आहाराचा योग्य वापर करावा हार्ट असोसिएशनने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे 160 ग्राम फळे आणि 240 ग्राम भाज्या खाल्ल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होती. वीस लाख लोकांवर केलेल्या संशोधनानंतर ही गोष्ट समोर आली आहे. खाण्यापिण्याच्या सवयी यांचे अशाप्रकारे पालन केलेल्या लोकांना मृत्यूचा धोका खूपच कमी असतो आणि त्यांचे आयुर्मान हे वाढलेले असते असे या संशोधकांचे म्हणणे आहे.