नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत असून दुसर्या दिवशी 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसर्या पर्वात सलग दुसरे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. देशातील आत्तापर्यंतचा सर्वात जास्त वेळा सामान्य अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. भारताचे चौथे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्री म्हणून 10 अर्थसंकल्प सादर केले. त्यांच्यानंतर अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्प संसदेत एकूण आठ वेळा सादर केले.
मोरारजी देसाई हे 13 मार्च 1958 ते 29 ऑगस्ट 1963 या काळात पहिल्यांदा अर्थमंत्री होते. त्यानंतर मार्च 1967 ते जुलै 1969 पर्यंत त्यांनी पुन्हा अर्थमंत्र्यांचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी संसदेसाठी केंद्राचे 10 अर्थसंकल्प सादर केले, त्यापैकी आठ पूर्ण बजेट होते, तर दोन अंतरिम अर्थसंकल्प होते. 1964 आणि 1968 मध्ये मोरारजी देसाई यांनी त्यांच्या वाढदिवशी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केले.
सर्वात जास्त चार वेळा अर्थमंत्री राहिलेले पी चिदंबरम यांनी ८ वेळा संसदेत अर्थसंकल्प सादर केला. 1 जून, 1996 रोजी एचडी देवगौडा यांच्या नेतृत्वात संयुक्त मोर्चाच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले. 21 एप्रिल 1997 पर्यंत ते अर्थमंत्री राहिले. यानंतर 1 मे 1997 पासून ते 19 मार्च 1998 पर्यंत तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते.