मुंबई – शेअर निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहेत. त्याचबरोबर जागतीक बाजारातून नकारात्मक संदेश येत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या लाटा येत आहेत. मंगळवारी शेअर बाजार निर्देशांकांत बरेच चढउतार झाल्यानंतर निर्देशांक कालच्या तुलनेत कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 18 अंकांनी कमी होऊन 52,861 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशाक निफ्टी 16 अंकानी कमी होऊन 15,818 अंकांवर बंद झाला.
टीसीएस, इन्फोसीस, रिलायन्स, टेक महिंद्र, मारुती, सन फार्मा या कंपन्यांना विकीचा मारा सहन करावा लागला. तर अल्ट्रा टेक सिमेंट, एचडीएफसी बॅंक, बजाज फायनान्स, टाटटन, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्याच्या शेअरची खरेदी झाली.
भारतात महागाई वाढणार असल्यामुळे व क्रुडचे दर वाढत असल्यामुळे रुपया घसरत आहे. त्यामुळे परदेशी संस्थांगत गुंवणूकदार गुंतवणूक काढून घेत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे. काल या गुंवणूदारांनी 338 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली.