बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवरून ते सतत काहीतरी पोस्ट शेअर करत असतात. अमिताभ यांनी नुकताच त्यांच्या चाहत्यांसाठी एक सुंदर मराठी कविता शेअर केली आहे. दरम्यान, बिग बींच्या कवितेला त्यांच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, “आठवणींची फुलपाखरे हातातून निसटतात…. आणि, सुमधुर स्मृतींचे रंग बोटावर सोडून जातात.”
T 3244 -“आठवणींची फुलपाखरे हातातून निसटतात….
आणि, सुमधुर स्मृतींचे रंग बोटावर सोडून जातात.” ~ Ef Nयादों की तितलियाँ हाथ से निकल जाती हैं…।
और, शौकीन यादों के रंग उंगली छोड़ देते हैं।— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 1, 2019
सध्या अमिताभ बच्चन आपल्या आगामी ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट असून, चित्रपटाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना प्रथमच एकत्र येणार आहेत.