कोंढवा, दि.6 (प्रतिनिधी) -अत्याधुनिक आगार, इलक्ट्रिक बस, चार्जिंग स्टेशन अशी आधुनिकीकरणाकडे
पीएमपी प्रशासन वाटचाल करीत असताना दुरस्था झालेल्या बसथांब्यांकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही. हडपसर-सासवड मार्गावरील अनेक पीएमपी बसथांब्यांची मोठी दुरवस्था झाल्याने प्रवाशांना तासन्ंतास ताटकळत उभे रहावे लागत आहे. आसन व्यवस्थाच नाही, राडारोडा, गवत, कचरा पडल्याचे चित्र बसथांब्यावर पहायला मिळत आहे. पीएमपी प्रशासनाने अशा बसथांब्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.
हडपसर-सासवड मार्गावरील सर्वच बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे अनेक ठिकाणी निवारा शेडच नसल्याने प्रवाशांना रस्त्यातच उभे रहावे लागत आहे. पत्रे फुटलेले, आसन व्यवस्था नाही, राडारोडा, कचराच अस्वच्छता अशा स्थिती बसची वाट पाहता प्रवाशांना उभे राहवे लागत आहे. या मार्गावर जीवघेणी वाहतूक कोंडी होत असल्याने या कोंडीतून मार्ग काढताना अनेक वाहनचालक आडवीतिडवी वाहने चालवित असतात.
अशावेळी रस्त्यावर उभ्य राहणाऱ्या पीएमपी प्रवशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने या मार्गावरील दुरवस्था झालेल्या बसथांब्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवशांकडून होत आहे.